नगर -दिव्यांगासाठी असणाऱ्या पाच टक्के निधीचे वाटप न केल्यास आठ दिवसानंतर पंचायत समितीसमोर घंटानाद करणार असल्याचे निवेदन रुद्र अपंग संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा सचिव बापू पांडूळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल सोनवणे, जिल्हा सरचिटणीस अमोल कराळे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांगासाठी असणारा पाच टक्के निधी, तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीनी आजपर्यंत वाटप केलेले नाही. दिव्यांगाच्या नावावर असणारी संपूर्ण घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी, ज्यांना घरे नाहीत त्याच्या खाती शिल्लक असणारा 5 टक्के निधी जमा करावा व दिव्यांगाना जगण्याची उमेद द्यावी. येत्या आठ दिवसात प्रत्येक ग्रामपंचातींनी आपल्या गावात असणाऱ्या दिव्यांगांना निधी वाटप करण्याच्या सुचना द्याव्यात, अन्यथा आठ दिवसानंतर पंचायच समितीसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल.