Vijay wadettivar : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. कीर्तनकार अजय बारसकर यांनी पत्रकार परिषदा घेत जरांगेंच्या विरोधात भूमिका घेतलीय. मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांत बंद दाराआड बैठका घेतल्या आहेत, असा आरोप बारसकर यांनी केला.
दरम्यान, या आरोपांनंतर आता मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.यावेळी ते माध्यमांशी बोलत बोलते होते. त्यानंतर आता जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले असून, मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालं आहे.
दरम्यान, अश्यातच या सर्व घटनेवर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन समाजात फूट पाडण्याचं काम या सरकारने केलं आहे. एकाला गोंजारायचं आणि दुसऱ्याला नाकारायचं हे काम सुरू आहे. जीआर काढला.
आम्हीच मराठ्यांना आरक्षण दिलं असं सांगितलं आणि आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसू दिला नाही, असंही या सरकारने म्हटलं. दोन्ही समाजाचे मते मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या –