Nitesh Rane On Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज निर्णायक बैठक घेतली आहे. त्यानंतर त्यांनी समाजाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केले आहे. तुम्हाला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो,’ असे आव्हान जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल. त्यानंतर राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.भाजप नेते नितेश राणे यांनी जरांगे यांच्या या भूमिकेवर जरांगे हे कोणाची स्क्रिप्ट वाचत आहेत ? असा सवाल उपस्थित केला आहे. | Nitesh Rane On Manoj Jarange
मला एका प्रश्नाचं उत्तर भेटलेल नाही कि जरांगे यांचा हा लढा समाजासाठी आहे की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आहे अशी शंका नितेश राणे यांनी व्यक्त केली. तसेच आता जरांगे यांच्या आंदोलनातून मला तुतारीच्या वास येऊ लागला आहे असेही राणे यावेळी म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत विधान केलं. | Nitesh Rane On Manoj Jarange
जरांगे पुन्हा पुन्हा आंदोलन का करत आहेत ? असा सवाल यावेळी नितेश राणे यांना विचारला असता ते म्हणाले,”त्यांची कारण त्यांना माहिती.आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल आहे आणि समाजाने ते स्वीकारलं आहे. आता त्यांच समाधान होत नाही त्याला काय करणार.जरांगे हे कोणाची स्क्रिप्ट वाचत आहेत ? असा सवाल देखील राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
त्यांनी जर राजकारण केलं आणि आमच्या नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप केले तर सागर बंगल्याच्या पुढे एक भिंत आहे ती त्यांना ओलांडणं अवघड जाईल कारण ती भिंत आमच्या लोकांची आहे. ती पहिली पार पाडा आणि मग सागर बंगल्यावर येण्याचा विचार करा. असा इशारा देखील यावेळी नितेश राणे यांनी दिला. | Nitesh Rane On Manoj Jarange
काय म्हणाले जरांगे ? । Nitesh Rane On Manoj Jarange
देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल.