मुंबई : आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होत आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करत आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या पाच सूत्रांनी झालेली प्रगती म्हणजेच विकास असतो. ही पंचसूत्रीच यंदाच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण आहे. त्यासाठी राज्यात विकासाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
या आहेत महत्त्वाच्या घोषणा
– नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार ऐवजी आता 75 हजार रुपयांचं अनुदान : अर्थमंत्री अजित पवार
-शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ, अन्न प्रक्रिया योजना राबवणार : अर्थमंत्री अजित पवार
-पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार : अर्थमंत्री अजित पवार
– कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी : अर्थमंत्री अजित पवार
-कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, दळणवळण आणि तंत्रज्ञान विकासाची पंचसुत्री
– हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
महाराष्ट्र विधानसभा थेट प्रक्षेपण