नारायणगाव – करोनामुळे गरीब, उपेक्षित, गरजू, बेघर लोकांचे संचारबंदीमुळे हाल होत आहेत. या सर्व लोकांना वारूळवाडी ग्रामस्थ व श्री भागेश्वर देवस्थान ट्रस्ट वारूळवाडी यांनी भाजीपाला व अन्नधान्याचे गेली 15 दिवसांपासून वाटप सुरु केले आहे.
वारूळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वारुळे, सचिन वारुळे, संपत वारुळे, गणेश वारुळे, अजित वारुळे, विशाल (बाबू) वारुळे, ललित वारुळे आदी कार्यकर्त्यांनी गेली 15 दिवसांपासून वारूळवाडी परिसरातील गरीब, उपेक्षित व गरजू, बेघर लोकांचे सर्वे करून सुमारे 500 कुटुंबीयांना किराणा, भाजीपाला व पाण्याची व्यवस्था करीत आहेत.
पोलीस बांधवाना, डॉक्टर, परिचारिका आणि आशासेविकांना मास्क आणि सॅनिटायझर सरपंच जयश्री बनकर, विपुल फुलसुंदर, राजेंद्र मेहेर, जंगल कोल्हे, ग्रामविकास अधिकारी मुळूक भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी जाऊन वाटप करण्यात आले.
यामध्ये बाळासाहेब वायकर, सुनील डोंगरे, संदीप वारुळे, विलास वारुळे, विनोद वारुळे, महेंद्र वारुळे, कुणाल वारुळे, नामू वारुळे, सतीश वारुळे, रुपेश डोंगरे, भाऊ बनकर, राजेश पाटे, श्रीकांत पाटील, दिलीप बनकर, संतोष कोल्हे, सत्यम वारुळे आदींनी विशेष सहकार्य केले.