वाराणसी :- भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाने शनिवारी येथील ज्ञानवापी मशिदीत 17व्या शतकातील मशीद हिंदू मंदिराच्या पूर्वीच्या जागेवर बांधली गेली होती की नाही हे शोधण्यासाठी त्यांचे वैज्ञानिक सर्वेक्षण कार्य पुन्हा सुरू केले आहे.
सरकारी वकील राजेश मिश्रा, यांनी सांगितले की, एएसआयच्या पथकाने सकाळी काम सुरू केले आणि ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपेल. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. भूतकाळातील जखमा पुन्हा भळभळतील अशी भूमिका घेत मुस्लिम पक्षाने या मशिदीच्या सर्वेक्षणाला अनुमती नाकारली होती.
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने मात्र एएसआयला सर्वेक्षणादरम्यान कोणतेही आक्रमक कृत्य अथवा पाडापाडी करू नये असे सांगितले.तेथे उत्खननही करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
वाराणसी जिल्हा न्यायालयाने जुलै महिन्यात पुरातत्व विभागाला सर्वेक्षणाचा आदेश दिला होता. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, पण उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळली. त्यानंतर मुस्लिम संघटनेने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तेथेही त्यांना अनुकुल निकाल मिळालेला नाही. वाराणसी न्यायालयाने एएसआयला सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त महिना अवधी दिला आहे, त्याची मूळ मुदत शुक्रवार ते 4 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.