Rahul Gandhis on Varanasi | काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि येथे ती पंतप्रधान मोदी, राज्य सरकार आणि केंद्रावर जोरदार निशाणा साधत आहे. राहुल गांधींची यात्रा उत्तर प्रदेशातील चंदौली, वाराणसी, अमेठीमार्गे मंगळवारी रायबरेली येथे पोहोचली.
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील भाषणात जे काही बोलले, त्यानंतर असा गदारोळ उठला आहे की, आता सातत्याने प्रतिक्रिया समोर येत आहेत. राहुल गांधींनी वाराणसीमध्ये तरुणांची दारू पिणे आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले आहे. ते म्हणाले की,“मी वाराणसीत गेलो होतो. रात्रीची वेळ होती. तिथे बाजा वाजताना मी पाहिला. बाजाच्या संगीतावर युपीचं भविष्य रस्त्यात नाचताना मी वाराणसीत बघितलं”, अशी टीका गांधी यांनी केली होती.
Rahul Gandhis on Varanasi | वादग्रस्त वक्तव्यावरून उत्तर प्रदेशच्या मंत्र्याने राहुल गांधींना धारेवर धरले
उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री दिनेश प्रताप सिंह म्हणाले की, ‘जो स्वतः ड्रग्ज घेतो तो इतरांना ड्रग्ज ॲडिक्ट म्हणतो. देश त्यांना नालायक सोडणार नाही. मी आणि माझे कुटुंब दारू पीत नाही.. यासाठी मी प्रमाणपत्र देऊ शकतो.. पण राहुल आणि त्याचे कुटुंबीय दारू पीत नाहीत का? त्याचे प्रमाणपत्र देऊ शकाल का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा
Uniform civil code on Assam | उत्तराखंडनंतर आसाममध्ये समान नागरी कायदा लागू ?