नवी दिल्ली – आज बुद्धपौर्णिमा आहे भारताच्या मातीत रुजलेला धम्म म्हणजे बौद्धधम्म. आज अनेक देश तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने जात आहेत. वैशाख बुद्धपौर्णिमा निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
PM Shri @narendramodi‘s keynote address on the occasion of Virtual Vesak Global Celebrations on Buddha Purnima.
https://t.co/OTuWEwMIWx— BJP (@BJP4India) May 26, 2021
या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या संवादात त्यांनी करोना काळात कोव्हिड रूग्णालयात डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कचे परिचारिका यांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी भगवान बुद्धांनी त्यांच्या प्रवचनात सांगितलेल्या मुद्यांचे महत्व सांगितले. ते म्हणाले, हवामान पद्दतीत बदल होत असून नद्या, जंगलं संकटात असल्याचा उल्लेख करत निसर्गाचा आदर करणं ही बुद्ध यांनी दिलेली शिकवणं आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले,’करोनाच्या संकटातून बचाव करण्यासाठी आता आपल्या देशाकडे लस असून जीव वाचवण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. करोना आल्यानंतर वर्षभरात लस येणं हा मानवी दृढनिश्चय दाखवतं. मला त्या सर्व वैज्ञानिकांचा अभिमान आहे, ज्यांनी लसनिर्मितीसाठी काम केलं. करोनाचा या महामारीत देशाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून इथून पुढे फक्त अशीच चर्चा असेल की आगामी काळात करोनाआधी आणि करोनानंतर असणार आहे.’
दरम्यान, मोदींनी यावेळी बुद्धाने आपल्याला जीवनशैली आणि निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली असल्याचं म्हटलं आहे.