पुणे – खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात एकूण 27.29 टीएमसी म्हणजे 93.63 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला प्रकल्पात 1.86 टीएमसी इतका कमी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा साधारण शहराला दोन महिने पुरेल इतका असल्याने पुणेकरांना पाणी जरा जपुनच वापरावे लागणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, टेमघर आणि पानशेत या धरणांनी तळ गाठला होता. जून महिना संपला तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शहराच्या पाणीकपातीची स्थिती झाली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धरणांच्या क्षेत्रात पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन धरणे भरली. चार टीएमसीचे टेमघर हे धरण अद्यापही भरलेले नाही. सद्यस्थितीत धरणात 77 टक्के साठा आहे. इतके भरले आहे. तर खडकवासला धरण 55 टक्के भरले आहे.
खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या पावसाने विश्रांती घेतल्याने धरणात जमा होणारा येवा कमी झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा स्थिर आहे. पानशेत धरणातून पॉवरहाऊसमधून 600 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. हे पाणी खडकवासला धरणात जमा होते. तर खडकवासला धरणातून कलाव्याद्वारे 1000 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
धरणाचे नाव पाणीसाठा टक्केवारी
खडकवासला 1.08 टीएमसी 54.94 टक्के
वरसगाव 12.82 टीएमसी 100 टक्के
पानशेत 10.56 टीएमसी 99.12 टक्के
टेमघर 2.83 टीएमसी 76.57 टक्के