शिरूर : शहरात लॉकडाऊन काळात औद्योगिक वसाहती शेकडो कर्मचाऱ्यांरी रोज शहरात येणे – जाणे करीत असून औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी शासनाने दिलेले आदेश धाब्यावर बसवले आहे. या कंपन्यांवर कारवाई कोण करणार द्विधा मनस्थितीत नागरिक आहेत. शिरूर आणि रांजणगाव पोलिसांना माहिती असताना कंपन्यांच्या बसवर कारवाई का करत नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपन्या सुरू कराच्या असतील तर कामगारांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी या आदेशाला धाब्यावर बसवले आहे. सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्याबरोबर शिरूर तालुक्यातील सणसवाडी शिक्रापूर या परिसरात कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांनी शासनाचा आदेश धाब्यावर बसून कामगारांची औद्योगिक वसाहतीत ये-जा सुरु आहे. यामुळे शहरात कोरोना संक्रमण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.