नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी लोकांना जबाबदारीने मतदान करण्याचे आणि राज्याची प्रगती राखण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मतदान करताना लक्षात ठेवा की तुमचं एक मत राज्याच्या प्रगतीत, तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांचं कल्याण, महिला सशक्तीकरण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
जनतेच्या हिताची धोरणे तयार करण्यास मदत करू शकते. “तुमचे मत राजकारण बदलू शकते, जबाबदारीने मतदान करा, असे ट्विट त्यांनी केले आहे.
पाचव्या टप्प्यात तब्बल 692 उमेदवार रिंगणात आहेत ज्यांचे राजकीय भवितव्य सुमारे 2.24 कोटी मतदार ठरवतील. उत्तर प्रदेशातील उर्वरीत दोन टप्प्यांसाठी आता प्रचार सुरू आहे.