लखनौ :– उत्तरप्रदेशचे अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी आज राज्याचा 6 लाख 15 हजार कोटींचा नवीन आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात विविध कल्याणकारी योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील घोषणा खालीलप्रमाणे –
* मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजनेत 1050 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून विधवांसाठी 600 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
* सामुहिक विवाहाच्या मदतीसाठीही 600 कोटी रूपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
* ओबीसी वर्गातील मुलींच्या लग्नासाठी दीडशे कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहेत.
* विद्यार्थ्यांना टॅबलेट्स आणि स्मार्टफोन देण्यासाठी 3600 कोटी रूपये दिले जाणार आहेत.
* राज्यातील रस्ते विकासासाठी 21 हजार 159 कोटी रूपये प्रस्तावित असून रस्त्यांच्या देखभालीसाठी 6209 कोटी रूपये ठेवण्यात आले आहेत.
* ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 1525 रूपये दिले जाणार आहेत. रेल्वेमार्गावरील पुलांसाठी 2538 कोटी रूपये खर्च करण्याचा संकल्प यात करण्यात आला आहे.
* राज्यात दहा लाख कोटींची गुंतवणूक आणून पुढील पाच वर्षात पर्यटन क्षेत्रात 20 हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे.
Delhi Mayor Election : भाजपनं दिल्ली गमावली, अखेर एमसीडीमध्ये आपचे सरकार
* ज्येष्ठ नागरीक आणि शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी 7248 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.
* ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांवर 12 हजार 631 कोटी रूपये खर्च केले जातील.