मुंबई – 2019साली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार होण्यासाठी हालचाली वाढल्या होत्या. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेत काही तासांच सरकार स्थापन केले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सरकार स्थापन झाले होते, असे विधान त्यांनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्थिर सरकार हवे आहे, म्हणून आपण सरकार तयार करू. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. यावरून आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल! . @NCPspeaks @ShivSenaUBT_ @BJP4Maharashtra
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) February 23, 2023
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे ट्विट
“उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल!” असं गोपीचंद पडळकर या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.