Unseasonal Rain । मागच्या काही दिवसांपासून राज्यात उकाड्याचा त्रास चांगलाच वाढला आहे. मात्र या उकाड्यापासून लवकरचकाही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह राज्यभरातील शहरांच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. राज्यात येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. तसेच रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वाऱ्याच्या परिणामी विदर्भात सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी किनारपट्टीवगळता राज्याच्या बहुतेक भागांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलीय .
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस ? Unseasonal Rain ।
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 kmph वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.
विदर्भात ऑरेंज, तर मराठवाड्यात येलो अलर्ट Unseasonal Rain ।
आयएमडीकडून राज्याच्या काही भागात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळमध्ये आज हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
हेही वाचा
Maharashtra Weather : उकाड्यापासून नागरिकांना दिलासा; राज्यात अवकाळी पावसाची शक्यता