Maharashtra Weather| राज्यात सध्या अनेक ठिकाणी उष्णतेची लाट दिसून येत आहे. एकीकडे उन्हाचा चटका असह्य होत आहे, तर दुसरीकडे वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे. त्यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
काही भागात येलो अलर्ट जारी Maharashtra Weather|
रविवारी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्या आला आहे. याशिवाय रविवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड तर खानदेशातील जळगाव, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील तापमानात वाढ होताना दिसत असताना उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. Maharashtra Weather|
‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी
अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच नागपूर, गोंदिया आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही भागात उन्हाच्या झळा Maharashtra Weather|
एकीकडे पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी, काही भागात उन्हाच्या झळा बसत आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पुढील 24 तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. येथे वेगळ्या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक भागात 40 अंशांवर तापमानाचा पारा गेला आहे.
हेही वाचा :
“भाजप हा देशातील सर्वात आवडता पक्ष, जनता…”; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास