आमदारांचा उद्या शपथविधी
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व करण्यास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी होकार दिला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तेच असतील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उद्या सकाळी आठ वाजता आमदारांचा शपथविधी होईल,असे जाहीर करण्यात आला.
हे सरकार संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल. शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या हितासाठी झाला होता. त्यामुळे राज्याचा विकासाचा कार्यक्रम घेत, हे सरकार हाच पाच वर्षाचा कार्यकाळ नव्हे तर पुढील अनेक वर्षे पाचचे पाढे मोजत बसा, असा टोला हे सरकार किती काळ चालेल असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लगावला.
कर्नाटक, गोव्यासारखा येथेही त्यांना घोडाबाजार करायचा होता. मात्र हा महाराष्ट्र आहे, अशा अमिषांना महाराष्ट्र बळी पडणार नाही. हे या निमित्ताने सिध्द झाले. आम्ही तीनही पक्ष एकत्र राहणार असून उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सक्षमपणे कारभार करू, असे मलिक म्हणाले.