जम्मू – भारतीय लष्कराच्या दोन जवानांचा जम्मू-काश्मीरमध्ये गूढ गोळीबारात मृत्यू झाला. ती घटना नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली. राजौरीमध्ये एलओसीलगत तैनात असणारे दोन जवान गोळीबारात जखमी झाले. नंतर त्यांचे निधन झाले.
गोळीबाराची माहिती समजल्यानंतर लष्करी अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. त्या घटनेचा अधिक तपशील तातडीने मिळू शकला नाही. त्यामुळे गोळीबार नेमका कुणी केला ते समजू शकले नाही.
कुठल्याशी कारणाने भांडण होऊन दोन्ही जवानांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची शक्यताही आजमावून पाहिली जात आहे. संबंधित घटनेचा सखोल तपास केला जात आहे. त्यातून गोळीबाराचे नेमके कारण समजण्याची शक्यता आहे.