नवी दिल्ली – देशासह राज्यात खरीप हंगामात तूर डाळीचे उत्पादन अपेक्षित असे मिळाले नाही. त्यातच रब्बी हंगामात तूर डाळीचे 10 टक्के उत्पादन घटले. यामुळे तूर डाळीत 25 टक्कांनी घट झाली असून बाजारात 6 लाख टन तूर डाळ उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात तूर डाळच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली आहे.
जगभरात भारत हा सर्वाधिक डाळींचे सेवन करणारा देश म्हणून ओळखला जातो. देशात दरवर्षी 42 ते 44 लाख टन तूर डाळीची मागणी असते. 2021-22 या आर्थिक वर्षात देशात 42.20 लाख टन तुरीचे उत्पादन, 2022-23 मध्ये 45.50 लाख टन उत्पादन घेण्यात आले. देशातील बहुतांश पीक हे खरीप हंगामात घेतले जाते. यंदा अवकाळी पाऊसामुळे तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे तूर डाळीत 25 टक्के घट झाली, तर रब्बी हंगामातही तूर डाळीत मोठी घट निर्माण झाली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात तूर डाळीचे हेक्टरी उत्पादन 880 किलो एवढे आहे. यात उच्च दर्चाची तूर 30 टक्के, मध्यम दर्जाची तूर 30 टक्के आणि खालच्या दर्चाची तूर 20 ते 30 टक्के असते. यातही तूर डाळ ही प्रक्रिया करताना 18 ते 20 टक्के वाया जाते. यंदा देशात किमान पाच ते साडेपाच लाख टनही तूट रब्ब हंगामात घेण्यात आली.
यात खरीप हंगामातही जवळपास 9 लाख टन उत्पादन झाले होते. खरीप हंगामातील तूर डाळीचे उत्पान हे नोव्हेंबर महिन्यात बाजारात येते, तर रब्बी हंगामात उत्पादन हे मार्च महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच तूर डाळीत मोठी तुट जाणवत असल्यामुळे दर वाढत आहेत.