अतिक्रमण हटेना, प्रशासन लक्ष देईना
कापूरहोळ – सुटीच्या दिवशी नसरापूर (ता. भोर) येथील होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. याबाबत ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.असून तर व्यापारी अतिक्रमण काढण्याच्या तयारीत नसल्याने येणारे पर्यटक, आणि प्रवाशांना नाहक या होणाऱ्या वाहतूक कोंडीटा सामना करावा लागत आहे. त्यामुले नसरापूर येथील अतिक्रमणे काढण्याची आवश्यकता आहे.
नसरापूर हे भोर व वेल्हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. रविवारी नसरापूरचा बाजार दोन्ही तालुक्यासाठी प्रसिध्द आहे. मोठ्या प्रमाणात व्यापारी व खरेदीदारांची बाजारात गर्दी होत असते. गावच्या मुख्य बाजारपेठे मधुनच वेल्हे तालुक्यासाठी जाणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे वेल्हे तालुक्यात जाणारे पर्यंटक याच रस्त्याचा वापर करतात.
नसरापूरचे प्रसिध्द बनेश्वर मंदिर या ठिकाणी देखील रविवार व सुटीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. या सर्व पर्यंटकांना या रविवारच्या वाहतुककोंडीचा त्रास नेहमी सहन करावा लागत आहे. या भागातील यात्रा देखील सुरु झाल्याने सध्या रस्त्यावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या पार्श्वभुमीवर वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत व पोलीस प्रसासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सुटीच्या दिवशी मोठ्या वाहतुककोंडीचा समाना प्रवासी, नागरिकांना करावा लागला. या रस्त्याच्या दुर्तफा अस्ताव्यस्त लावलेली वाहने, दुकानदारांनी रस्त्यालगत केलेले अतिक्रमण, वाहतूक नियंत्रण करण्यासाठी अनुपस्थित असलेले पोलीस कर्मचारी यामुळे याठिकाणी सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
या रस्त्यावर नेहमीच हतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते. अनेक ठिकाणी वादविवाद होत होते.या वाहतुक कोंडीबाबत अनेक वेळा वर्तमानपत्रात बातम्या आल्या, अनेक वेळा चर्चा देखील झाल्या आहेत. व्यापाऱ्यांना बसण्यासाठी पांढरी फक्की मारुन जागा निश्चित करणे, प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना रविवारी मुख्य रस्त्यावर थांबू न देणे, पोलीस कर्माचाऱ्यांची नियुक्ती करणे असे उपाय करण्यात आले, परंतु ते सातत्याने चालू शकले नाहीत.
त्यामुळे पुन्हा पुन्हा वाहतुककोंडी होतच आहे. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस ठाणे व ग्रामपंचायतीकडून एक वॉर्डनची नियुक्ती केली आहे. परंतु दोन ते तीन किलोमीटर अतंरासाठी एक वॉर्डन काहीच करु शकत नाही, अशी परिस्थीती या ठिकाणी निर्माण झाली आहे.
नसरापूर येथील वाहतूक कोंडीमुळे पर्यटक, प्रवाशांना नाहक त्रास होत असल्याच्या यापूर्वी तक्रार आल्या आहेत. येथील अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबधीतांना दिले आहेत. तरी सुद्धा कार्यवाही होत नसेल तर या आठवड्यात मी स्वतः उपस्थित राहून याबाबत कारवाई करणार आहे.
– अजित पाटील, तहसीलदार भोर