नवी दिल्ली – वाढलेला वाहतुकीचा खर्च आणि पावसामुळे झालेला उत्पादनावरील परिणाम यामुळे बऱ्याच शहरांमध्ये टोमॅटोचे दर सध्या 80 रुपये प्रति किलो या पातळीवर गेल आहेत.
या घडामोडीची सरकारला जाणीव असून लवकरच या किमती स्थिर होतील असे सरकारला वाटते. चेन्नई टोमॅटोचे दर 100 रुपये, पांडेचरीत 90 रुपये, बंगलोर मध्ये 88 रुपये, हैदराबाद मध्ये 65 रुपये प्रति किलो झाले आहेत. केरळमधील काही शहरात टोमॅटोचे दर 110 रुपये प्रति किलोच्या पुढे गेले आहेत. कर्नाटकमध्ये टोमॅटोचे दर 85 रुपये, आंध्र प्रदेशात 91 रुपये, तिरुपतीमध्ये 75 रुपये झाले आहेत.
तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी दर 119 रुपयावर गेले आहे. मात्र दिल्लीमध्ये टोमॅटोचे दर तुलनेने कमी पातळीवर आहेत. दिल्ली टोमॅटोचे दर 72 रुपये प्रति किलो असल्याचे दिसून येते. दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्यामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर वाहतुकीवरही परिणाम झाल्यामुळे टोमॅटोचे दर वाढले आहेत. आता पाऊस थांबला आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती पूर्ववत होईल असे दिल्लीतील आझादपुर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी सांगितले.