नवी दिल्ली : केंद्र सरकाने देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची म्हणजेच ‘वन नेशन वन इलेक्शन’ संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विचार करण्यासाठी मोदी सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीदेखील स्थापन केली आहे. मात्र, याबाबत विरोधी पक्षनेत्यांच्यामतांमध्ये भिन्नता आढळून आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जयपूरमध्ये म्हटले आहे की, देशात एकाचवेळी निवडणुका झाल्या तर पाच वर्षांनी सिलिंडर ५ हजार रुपये आणि टोमॅटो १,५०० रुपये किलोने मिळतील” वक्तव्य करत केंद्राच्या संकल्पनेला विरोध केला आहे.
याविषयी बोलताना केजरीवाल यांनी,”वन नेशन २० निवडणुका व्हाव्यात ही माझी मागणी आहे, असे म्हटले आहे. त्यासोबतच देशात दर तीन महिन्यांनी निवडणुका व्हाव्यात, असे झाले तर निदान काही तरी नेतेमंडळी जनतेच्या विकासाची कामे करतील , नाहीतर पाच वर्षे तोंड दाखवणार नाही’असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना केजरीवाल यांनी,”मी खूप विचार केला की मोदीजी वन नेशन-वन इलेक्शन का म्हणत आहेत. विचार केल्यावर वस्तुस्थिती काय आहे ते मला समजले. मला सांगा, पाच वर्षात तुमच्या जवळ नेता कधी येतो, ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी. आता आपल्या देशात , दर सहाव्या महिन्याला. निवडणुका झाल्या की मोदीजींना त्रास होतोय की दर सहाव्या महिन्यात त्यांना जनतेत जाऊन काहीतरी बोलावे लागते. जर 5 वर्षातून एकदा निवडणुका झाल्या तर 5 वर्षांनी तुम्हाला 5000 रुपयांचा सिलेंडर मिळेल आणि म्हणतील तुमचे 200 रुपये माफ झाले आहेत. त्यासोबतच आता 250 रुपयांना मिळणार टोमॅटो वन नेशन वन इलेक्शन झाले तर तेच भविष्यात प्रति किलो 1.5 हजार रुपये किलोने मिळेल”, असे म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान,, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 8 सदस्यीय समितीमध्ये अमित शहा, अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एनके सिंग, सुभाष कश्यप, हरीश साळवे आणि संजय कोठारी यांचा समावेश आहे. मात्र, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून समितीचा भाग होण्यास नकार दिला आहे.