स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संघटित होऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, 2047 पर्यंत देशाचा विकास करायचा आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाषणात दोनदा माझे शब्द लिहून ठेवा असे दोनदा म्हणाले. जाणून घेऊया काय म्हणाले पंतप्रधान मोदी…
हजार वर्षांचा कालावधी –
‘त्याग-तपश्चर्याचे विशाल रूप 1947 मध्ये अखेर यशस्वी झाले, हजार वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली. मी हजार वर्षांबद्दल बोलत आहे कारण देशासमोर पुन्हा एक संधी आली आहे. अशा काळात आपण जगत आहोत, आपण भाग्यवान आहोत की भारताच्या अमृतकालचे हे पहिले वर्ष आहे. एकतर आपण तारुण्यात जगत आहोत किंवा भारतमातेच्या कुशीत जन्म घेतला आहे. माझे शब्द लिहून घ्या, या काळात आपण जे काय करू, जे पाऊन उचलू, जे बलिदान देऊ, यातून येत्या एक हजार वर्षांचा देशाचा सुवर्ण इतिहास अंकुरणार आहे. या काळात घडलेल्या घटना पुढील एक हजार वर्षांपर्यंत प्रभाव निर्माण करतील. पंचप्राणात समर्पित होऊन देश नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे.
पायाभरणीपासून उद्घाटनाचे भाग्य –
‘आज भारत जुनी विचारसरणी मागे टाकत आहे, जेव्हा मी म्हणतो की ज्याची पायाभरणी आमच्या सरकारने केली, त्याचे उद्घाटनही आमच्याच काळात होते. आजकाल मी जी पायाभरणी करतोय, तुम्ही लिहून ठेवा त्याचे उद्घाटनही तुम्ही सर्वांनी माझ्या नशिबात ठेवले आहे.
Glimpses from the Independence Day celebrations at the Red Fort in Delhi. pic.twitter.com/vNx1jeWK9A
— PMO India (@PMOIndia) August 15, 2023
‘मी लाल किल्ल्यावर आलोय तुमची मदत घ्यायला’
पंतप्रधान म्हणाले की, ‘स्वप्न अनेक आहेत, संकल्प स्पष्ट आहेत, धोरणे स्पष्ट आहेत, हेतूसमोर प्रश्नचिन्ह नाही, परंतु काही वास्तव स्वीकारावे लागतील. ते सोडवण्यासाठी, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, मी तुमची मदत घेण्यासाठी आज लाल किल्ल्यावर आलो आहे. मी लाल किल्ल्यावरून तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. गेल्या काही वर्षात देशाला जो अनुभव आला, त्याची चाचपणी केली, त्या अनुभवाच्या आधारे आज आपण त्यांच्याकडे गांभीर्याने बघायला हवे, असे मी म्हणत आहे.
पंतप्रधान म्हणाले, 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, त्या वेळी भारताचा तिरंगा, विकसित भारताचा तिरंगा जगासमोर असायला हवा. आम्हाला क्षणभरही थांबायचे नाही, मागे हटायचे नाही. त्यासाठी स्वच्छता, पारदर्शकता, निष्पक्षता ही पहिली गरज आहे.