नवी दिल्ली : प्रयागराजच्या कॅल्विन वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर १५ एप्रिलच्य रात्री जे काही घडलं ते मीडियाच्या कॅमेरातून संपूर्ण जगाने पाहिले.अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ती घटना सगळ्या जगाने पाहिली. दरम्यान, घटनेवरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांच्या या प्रश्नामुळे या हत्याकांडाविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कपिल सिब्बल यांनी एक ट्वीट करत त्यात त्यांनी लिहिले आहे, “अतिक आणि अशरफ, नष्ट करण्याची कला, आश्चर्यचकित करणारी गोष्ठ आहे की, रात्री १० वाजता वैद्यकीय तपासणी करणार होते. पीडितांना चालत नेलं जात होतं. माध्यमं सहज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होती. मारेकरी एकमेकांना ओळखत नव्हते. त्यांच्याकडे सात लाखांची शस्त्र होती. हल्लेखोर आधीपासूनच प्रशिक्षित होते. तिन्ही मारेकऱ्यांनी हत्येनंतर आत्मसमर्पण केलं.”
Atiq & Ashraf
(The art of elimination)Odd:
1) 10pm for medical check up ?
2) No medical emergency
3) made victims walk
4) open to media?
5) assassins unknown to each other at the spot ?
6) weapons above 7lakhs
7) well trained to shoot !
8) All 3 surrendered— Kapil Sibal (@KapilSibal) April 17, 2023
अतिक आणि अशरफ या दोघांच्या हत्येचा कट रचला गेला का? हा प्रमुख प्रश्न आहे. कारण या दोघांना ठार करणारे तीन हल्लेखोर विविध भागातून प्रयागराजला पोहचले होते. या तिघांनी जय श्रीरामचे नारे दिले. हत्या केल्यानंतर तातडीने बंदूक फेकून देत आत्मसमर्पण केले. त्यामुळे यामागे नियोजन करून कट रचला गेला का? हा प्रश्न उपस्थित करण्यात होत आहे.
दरम्यान, कपिल सिब्बल यांनी केलेले हे सवाल योगी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. देशभरातून भाजप आणि योगी सरकारवर टीका करण्यात येत आहे.