लॉकडाऊनमध्ये विमान तिकीट कॅन्सल केलेल्या प्रवाशांना दिलासा
नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात म्हणजे 25 मार्चपासून 24 मेपर्यंत ज्या प्रवाशांनी विमानाची तिकिटे कॅन्सल केली अशा प्रवाशांना तीन आठवड्याच्या आत तिकिटाचे पैसे परत द्यावेत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
हा निकाल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात केंद्र सरकारचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. यानुसार ज्या प्रवाशांनी लॉकडाऊनच्या काळात प्रवासासाठी एजंटच्यामार्फत तिकिटे बुक केली होती, त्या प्रवाशांना विमान कंपन्यांनी पूर्ण परतावा द्यावा. एजंटच्या माध्यमातूनच ही प्रक्रिया पूर्ण केली जावी, असे न्यायालयाने सांगितले.
जर आर्थिक अडचणीमुळे विमान कंपन्यांना पैसे देणे शक्य नसेल तर त्यांनी संबंधित प्रवाशांची रक्कम त्याच्या नावावर जमा ठेवावी. प्रवाशांना ही रक्कम पुन्हा तिकिटासाठी 31 मार्च 2021 पर्यंत परण्याची मुभा असावी.