नवी दिल्ली- लग्न सोहळा म्हंटला कि नवरी-नवरदेवाच्या कुटुंबामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण असते. परंतु उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एका लग्नासोहळ्यामध्ये काळाने अचानक घाला घातला असून नवऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात शोककळा निर्माण झाली आहे.
दरम्यान, हि घटना सोमवार (29 मे) रोजी घडली असून घटनेमधील मृत तरुणाचे नाव राजकमल असे आहे. राजकमलचे लग्न उत्तर प्रदेशमधील लक्ष्मी कोयपुरवा अथैसा या गावात जमले होते. लग्नाची वरात निघणार म्हणून सगळेच लोक आनंदी होते.
परंतु अचानक तरुणाची प्रकृती बिघडली. हि गोष्ट कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणाला तातडीने मुस्तफाबाद येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सदर घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.