नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनीही मतदान केले. दरम्यान, प्रचार थंड असला तर असेच होणार अशी प्रतिक्रिया त्यांनी मतदानातील निरूत्साहाबद्दल बोलताना दिली.
यावेळी निवडणुकीत कोणता मुद्दा असेल असे तुम्हाला वाटते असा प्रश्न टिकैत यांना एका न्यूज चॅनलने विचारल्यावर ते म्हणाले जातीचा मुद्दा असेल, धर्माचा मुद्दा असेल, भाषेचा मुद्दा असेल किंवा प्रांतवादाचाही मुद्दा असेल. काय असेल काही सांगता येत नाही.
मतांच्या टक्केवारीबाबत त्यांना विचारल्यावर त्यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले निवडणूक लढणारेच ढिलेपणाने निवडणूक लढत असतील, खर्च करत नसतील, आरोपांमध्ये कपात करत असतील आणि भडक विधाने करत नसतील तर असेच होणार.
चूल जर पेटवलीच नाही तर पोळी कच्चीच राहणार ना? त्याचप्रमाणे निवडणूक आंदोलन पण आहे. त्यासाठी निवडणुकीचे आंदोलन अगोदर गरम करावे लागते. आंदोलन हे मुद्द्यावरच होत असते. जनताच ही निवडणूक शिथील करते आहे.