नवी दिल्ली – करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक जणांचे रोजगार गेले असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता याच बेरोजगारीच्या विषयावरून सरकारला लक्ष्य करत निशाणा साधला आहे.
तुमची नौकरी गेली आणि तुम्हाला भविष्य निर्वाह निधीचे खाते बंद करावे लागले. केंद्र सरकारच्या रोजगार मिटाओ अभियानाचे हे आणखी एक यश आहे, अशी खोचक टिप्पणी करतानाच राहुल यांनी एक बातमीही आपल्या ट्वीटरवर शेअर केली आहे.
करोनाच्या काळात असंख्य लोक बेरोजगार झाले असून गेल्या 9 महिन्यांच्या काळात इपीएफची 71 लाख खाती बंद झाली असल्याची ती बातमी त्यांनी दाखवली आहे.
आपकी नौकरी गयी और EPF अकाउंट बंद करना पड़ा।
केंद्र सरकार के रोज़गार मिटाओ अभियान की एक और उपलब्धि! pic.twitter.com/MSxyvMeot8
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 18, 2021