Sanjay Raut on Devendra Fadnavis| राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काल रविवारी मुंबईत समारोप झाला. यावेळी इंडिया आघाडीची जाहीर सभा झाली. एकीकडे राहुल गांधी मुंबईत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी “काँग्रेस न होती तो क्या होता” या पुस्तकाचे प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फडणविसांनी मी पुन्हा येईल म्हटलो होतो. थोडा वेळ लागला पण मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो,’ असे विधान केले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत फडणविसांना आव्हान दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल या वाक्याचा पुनरुच्चार केला. ‘मी पुन्हा येईल म्हटलो होतो. थोडा वेळ लागला पण मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. मी फार संयमी व्यक्ती आहे. मात्र योग्यवेळी उत्तर द्यावंच लागतं,’ अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे गटावर निशाणा साधला होता. Sanjay Raut on Devendra Fadnavis|
त्यावर संजय राऊत यांन प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “ज्या दिवशी आमच्या हाती केंद्राची सत्ता ईडी आणि सीबीआयसह येईल त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा, लोहा लोहे को काटता है, हे आम्हालाही माहिती आहे, फक्त त्यांनाच माहिती आहे असं नाही,” असं थेट ओपन चॅलेंज राऊतांनी केलं आहे.
दुसऱ्यांची पोरं पळवणारा पक्ष Sanjay Raut on Devendra Fadnavis|
भाजप दुसऱ्यांची पोरं पळून मोठा झालेला पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवणारा पक्ष. स्वतःची पोरं नाहीत. सर्व फोडलेली पोरं आमची ते घेऊन ते बसले आहेत. स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालवू नका ते पुन्हा पळून जातील,” असा इशारा देखील संजय राऊतांनी भाजपला दिला.
हेही वाचा :
“मी पुन्हा आलो आणि जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो,” देवेंद्र फडणवीसांचे विधान