नगर – निसर्ग व पर्यावरण मंडळाचा प्रत्येक पदाधिकारी व सदस्य पर्यावरण संवर्धन हे एकच ध्येय समोर ठेऊन कार्य करीत आहे. मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली असून, ते जगविण्यासाठी देखील वर्षभराचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच राज्यात बीजरोपण मोहिम राबविण्यात आली असून, त्याचा देखील चांगला परिणाम मिळणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आज केलेले कार्य भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी असल्याचे, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे राज्याध्यक्ष तथा वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी म्हटले.