पुणे – पीएमपीएमएलकडून तब्बल 1 कोटी रूपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पवनचक्क्या पुन्हा फिरू लागल्या आहेत. एवढया मोठया प्रमाणात खर्च केल्यानंतरही या पवनचक्क्या नियमित देखभाल दुरूस्ती होत नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होत्या. त्यामुळे या प्रकल्पावर झालेल्या उधळपट्टीचा वाया गेला असल्याचे वृत्त ” पीएमपीच्या पवनचक्क्या जाम” या वृत्ताद्वारे दैनिक प्रभातने उघडकीस आणले होते.
त्याची गंभीर दखल घेत अखेर या पवनचक्क्या दुरूस्त करण्यात आल्या असून पुढील तीन ते चार दिवसात उर्वरीत काम पूर्ण करून वीज निमिर्ती प्रकल्प सुरू केला जाणार असल्याची माहीती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
2017 मध्ये पीएमपीच्या स्वारगेट येथील डेपोच्या इमारतीवर हवेतून वीज निर्मितीसाठी चार पवनचक्क्या उभारण्यात आल्या होत्या. या कामासाठी 1 कोटी 8 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर, या पवनचक्क्यांतून अवघी 27 हजार 868 युनिट वीजनिर्मिती झाली आहे.
“या पवनचक्क्या 2017 मध्ये बसविण्यात आल्या होत्या. त्यासाठी 1 कोटी 8 लाखांचा खर्च पीएमपीने केला असल्याची माहिती समोर आली होती. सद्यःस्थितीत या चारही पवनचक्क्या नादुरुस्त असून, त्यातून 0 युनिट वीज उत्पादित होते. त्या केव्हापासून बंद आहेत, याची कोणतीही माहिती पीएमपीकडे नाही.मात्र, हा प्रकार समोर आल्याने प्रशासनाने तातडीनं दखल घेत हे काम सुरू केले याचा आनंद आहे. मात्र, त्यातून प्रत्यक्षात वीज निर्मिती आणि त्याचा वापरही होणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात त्या पुन्हा खराब होणार नाहीत याची काळजी पीएमपीने घेणे आवश्यक आहे.”
– निलकंठ मांढरे (पीएमपी प्रवासी )
तर त्यातून पीएमपीचे विजेचे 2 लाख 64 हजार 746 रुपये वाचले आहेत. त्यामुळे एक कोटींच्या खर्चातून पीएमपीने अवघा अडीच लाखांचा फायदा मिळविला आहे. या पवनचक्क्याही गेल्या दोन वर्षांपासून बंद असून, त्या आऊटडेटेड झाल्याने त्याचे खराब झालेले भागच मिळत नसल्याने त्या बंद होत्या.