हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : उन्हाळा सुरु झाला असला तरी थंडी अजूनहीअंगात असल्यासारखी जाणवत आहे. तर शिशिर ऋतू मावळून आता वसंत बहरायला सुरुवात झाली आहे. अशातच ठिकठिकाणी पळसाची फुलं रंग उधळताना दिसत आहेत. पळस म्हणजे पलाश वृक्ष… रानाचा अग्नी. इंग्रजीत तर त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ असं म्हटलं जातं.
वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचं झाड सर्वांचंच लक्ष वेधून घेतंय. हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात बहरलेली पळसाची झाडे अनेकांना मोहवून टाकत आहेत. उन्हाळा सुरू झाला की, झाडांना पानगळ लागते आणि निष्पर्ण वृक्षांचे सांगाडे पाहवयास मिळतात. अशावेळी उन्हाळ्यातही काही झाडं बहरत असतात. यातलाच एक पळस पिवळा, लाल जर्द पळस आपले लक्ष वेधून घेतो.
हा वृक्ष वर्षभर हिरवागार पण वसंत ऋतू आला, की याची पानगळ होते. एकही पान झाडाच्या फांदीवर शिल्लक राहत नाही. परंतु पुढच्या काही दिवसांतच लालभडक फुलांनी फुलून जातो. निसर्गाची ही रंगपंचमी मनाला भुरळ.घालते. विशेष म्हणजे प्राचीन काळापासूनपळसाचा.औषधशास्त्रात औषध म्हणून उपयोग होतो.
पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याच्या पानाचा वापर होतो. पळसाला गर्द केशरी रंगाची फुले येतात,काही ठिकाणी पिवळ्या रंगाची फुले सुध्दा येतात महाराष्ट्रात हिवाळ्यात डिसेंबर-जानेवारीत फुले येण्याची सुरुवात होते याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे.
पोळा या सणाच्या वेळी पाच पानाच्या पळसाने बैलांचा खांदा मिळण्याची प्रथा आहे. पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून “पळसाला पाने तिनचं” ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट (Flame of the forest) असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो सपुर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .
हा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.पत्रावळी लावण्यासाठी तिन पानापैकी केवळ टोकाचे (मधलेच) पान उपयोगी पडतात, या पत्रावळी लावण्यासाठी शक्य तो श्रावण-भाद्रपद महिन्यात पानांचा उपयोग होतो, या पत्रावळी टाचण्यासाठी लिंबाच्या झाडाच्या लिंबोळी येणाऱ्या काड्या किंवा ज्वारीच्या धांड्याच्या शिलका वापर करतात, ह्या काड्या उन्हाळ्यात जमा करून ठेवाव्या लागतात,
पत्रावळी उजव्या हातावर लावावी लागते नसता उलट फेरा येतो, द्रोण बनवण्यासाठी विषेश कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी दोन पानांचा वापर केला जातो, पत्रवाळी लावने ही एक कला आहे,तिचे कसब अलिकडच्या कळात विसर आहे.पत्रावळी पाच, सात अश्या प्रकारे तयार होते, पुर्वी पत्रावळी बनवून त्या सुकविणे जर व्यवस्थीत ठेवले नाही तर त्यावर बुरशी येऊन त्या खराब व्हायच्या,पत्रावळी संग्रहीत करून घरी सणाला, किंवा इतर कार्यासाठी वापर करत.
काही तर या पत्रावळीच्या व्यवसाय करत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत, आणि या पत्रावळी च्या वापरामुळे पर्यावरण संतुलित राखण्यासाठी मदत होत असे, पळसाच्या फुलांचा उपयोग शिमग्याच्या वेळी रंग तयार करण्यासाठी होत असे, त्याचे येणाऱ्या उन्हाळ्यात त्वचा व शरीर उन्हापासून रक्षण करण्यासाठी आयुर्वेदिक उपयोग होत असे.