पुणे – असंख्य वाचकांच्या शुभेच्छांची शिदोरी घेत “दै. प्रभात” ८९ वर्षांची वाटचाल पूर्ण करून ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त आज (दि. ५ जानेवारी) कै. वा. ब. गोगटे प्राथमिक विद्यालय प्रांगणात स्नेहमेळावा आयोजित केला आहे. ध्येयनिष्ठ, व्यासंगी आणि विवेकी पत्रकारितेची कास धरत गेल्या 89 वर्षांपासून दैनिक ‘प्रभात’ने समाजोन्नतीचा वसा अबाधितपणे सुरू ठेवला आहे.