New Delhi,
नवी दिल्ली : राजकोट आणि अहमदाबाद या शहरात दोनशेहून अधिक अर्भकांचे मृत्यू झाले त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी का मौन बाळगले आहे? मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या प्रश्नाला का उत्तर दिले नाही ? असे सवाल करत भारतीय जनता पक्षावर कॉंग्रेसने टीकेची झोड उठवली आहे.
राज्याचे कॉंग्रेसचे प्रभारी राजीव सातव म्हणाले, या अर्भकांच्या मृत्यूबाबत गुजरातच्या विकासाचा सगळीकडे डंका पिटणारे पंतप्रधान आणि गृहमंत्री कधी मौन सोडणार आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, निष्काळजीपणामुळे डिसेंबरपर्यंत वर्षभरात राजकोटमध्ये 1250 मुलांनी प्राण सोडले आहेत. गांधीनगरमध्ये अवघ्या तीन महिन्यात 250 मुलांचा मृत्यू झाला आहे.
कोटामध्ये दोन मंत्री तळ ठोकून आहेत. पण मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या मतदार संघात 134 मुलांचा मृत्यू झाला. पण या बाबतच्या प्रश्नाला उत्तर देण्याची तसदी ते घेत नाहीत. राजकोट आणि अहमदाबादमध्ये महिन्यात 134 मुलांचा मृत्यू झाला आहे. तीन महिन्यात 253 अर्भकांचे प्राणोत्क्रमण झाले आहे. राज्यात 1 लाख 40 हजार मुले कुपोषित आहेत. याला जबाबदार कोण? असे कॉंग्रेस नेते शक्तीसिंग गोहील म्हणाले.