मुंबई – महाराष्ट्रात करोनानं थैमान घातलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर विषाणूंचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांनी काही निर्णयही घेतले आहेत. पण भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना महाराष्ट्राला सध्या अनुभवी देवेंद्र फडणवीसांची गरज आहे असं म्हटलं आहे. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.
निरंजन डावखरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे.
निरंजन डावखरेंच्या या ट्विटरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. रोहित पवारांनी समाचार घेत खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारणहोम क्वारंटाईन करा. तुमचा एवढा अभ्यास व अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी?.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही निरंजन डावखरेंना उत्तर दिलं आहे.असल्या राजकारण्यांना पहिले क्वारंटाईन केले पाहिजे. तुमच्या नेत्यांना वुहान, स्पेन किंवा इटली मध्ये घेऊन जा. तसेही जगातला सर्वात मोठा पक्ष आहे तुमचा, असं ते म्हणाले होते.
Corona ha kay fakta Maharashtrat nahi ahe akkya bhartat BJP che kuthe kuthe mukhyamantri ahet tithe te loka swata ani tumcha BJP kiti samrtha ahe hya corona vishayi ldha dyayla te bagha mag bola ithe jantechya jivan marnachi vel aliye ashya veles madat karaychi sodun ugach kontyahi goshtivar rajkaran kartayet samajla pahije ashya akkal shunya mansala mag to koni hi aso va kontyahi pakshyacha aso
आपत्ती व्यवस्थापनात सर्वात जास्त अनुभव हा मा. शरद पवार साहेबांना आहे.
अटल बिहारी साहेबांनी त्यांच्यातली क्षमता बघून गुजरात मध्ये पाठविले होते. हे बहुतेक डावखरे साहेब विसरले का?
पवार साहेबांचा फायदा मा. उद्धव ठाकरे साहेबांना होणार आहे.
आपत्ती व्यवस्थापनात फडणवीस याना किती अनुभव आहे हे माहीत नाही. तसे असते तर तो कोल्हापूर/ सांगली मध्ये दिसला असता.
फडणवीसांना जागतिक पातळीवर जरी काम सांगितलं तरी ते यशस्वी होतील यात वादच नाही. असे लोकच हवेत गंभीर परिस्थिती हाताळायला. याच कारण फडणवीस आपल्या शब्दाला जागणारे आणि समोरचा माणूस कोणीही असला तरी त्याच्या न्याय्य मागणी साठी मनापासून झटणारे आहेत.
अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे ही, आपल्या राज्यात कोरोना व्हायरस इतका प्रचंड प्रमाणात पसरत आहे तरी सुद्धा काही पुढारी लोक राजकारण करत आहेत यांना जनतेचं काही घेण देन नाही
फक्त बीजेपी व फडणीस शहाणे बाकी मुर्ख आहेत काय