लखनौ – बिहारमध्ये आज देण्यात आलेला भाजप हटावचा नारा देशात दूरपर्यंत जाईल असा दावा उत्तर प्रदेशचे विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे.
ही एक चांगली सुरूवात आहे. आपण स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ब्रिटीशांना हटवण्याचा नारा दिला होता. आज भाजप हटावचा नारा दिला जातो आहे. लवकरच सगळे राजकीय पक्ष आणि विविध राज्यांतील जनता भाजपच्या विरोधात उभी राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नितीश यांनी विश्वासघात केला असल्याचा आरोप बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनी केला आहे. आम्ही 74 जागा जिंकूनही नितीश यांना मुख्यमंत्री केले होते.
मात्र त्यांनी बिहारच्या जनतेचाही विश्वासघात केला आहे. त्यांनी जनादेशाचे उल्लंघन केले आहे. राज्यातील जनता हे सहन करणार नाही. असेही जयस्वाल यांनी म्हटले आहे.