पिंपरी – थेरगावातील पद्मजी पेपर मिलमुळे प्रदूषण वाढल्याची तक्रार करत कारवाई करण्याची खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेली मागणी अयोग्य आहे. शेकडो कामगारांचा कोणताही विचार न करता खासदारांनी घेतलेली भूमिका आगामी भरती प्रक्रिया डोळ्यासमोर ठेवून केल्याचा आरोप माजी नगरसेवक संतोष बारणे यांनी गुरुवारी केला.
खासदार श्रीरंग बारणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पद्मजी मिलबाबत तक्रार केली होती. याबाबत संतोष बारणे यांनी काही स्थानिक नागरिकांसमवेत पत्रकार परिषद घेऊन खासदारांची भूमिका अयोग्य असल्याचे म्हटले.
कंपनीत आगामी काळात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे त्यांनी ही तक्रार केल्याचा आरोप बारणे यांनी केला आहे. या संदर्भात खासदारांशी सपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.