मुंबई – ओडिशा रेल्वे अपघातानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अद्यापही बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी. कारण सत्यता समोर येईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी सर्वांकडून केली जात आहे. त्यामधून सत्यता समोर येईलच. त्यानंतर पुढील काही गोष्टी सुचवता येतील.
लाल बहादूर शास्त्री हे रेल्वेचे मंत्री असताना 2 वेळा रेल्वे अपघात झाला होता. पंडीत जवाहरलाल नेहरू राजीनामा देण्याच्या दिवशी लालबहादूर शास्त्रींनी ही माझी नैतिक जबाबदारी आहे.
त्यामुळे मी या पदावर राहू इच्छित नाही, असे म्हणत त्यांनी राजीनामा दिला होता. आता हे एक उदाहरण देशाच्या समोर आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांना योग्य वाटत असेल तसे करावे, असेही शरद पवार म्हणाले.