नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी कोविड -19 च्या परिस्थितीबद्दल धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
देश हितासाठी समाज आणि सरकार एकत्रित काम करत असल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे हा संवाद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कोविड -19 ने उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या संस्थांनी केलेल्या कामांचे त्यांनी कौतुक केले.
लोकांना देण्यात येणारी मदत ही जात किंवा धार्मिक विचारांच्या पलीकडची असून हे एक भारत-एकनिष्ठ प्रयासचे एक लक्षणीय उदाहरण आहे असे ते म्हणाले. गरजूंना अन्न आणि औषधे मिळवून देण्यात मदत करण्याबरोबरच देशभरातील मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारा ह्यांनी रुग्णालये आणि विलगीकरण केंद्रे म्हणूनही काम केले असे त्यांनी सांगितले.
देशातील लसीकरण मोहीम जलदगतीने सुरु असल्याबद्दल सांगतानाच पंतप्रधानांनी “सर्वाना मोफत लस’ ही मोहीम कोरोनाविरूद्धच्या लढ्यात ढालीसारखी असल्याचे म्हटले. त्यांनी लसीबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच लसीबद्दलच्या अफवा व गोंधळ दूर करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नात सामील होण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी त्यांना सरकारच्या सहकार्याने काम करण्यास सांगितले, विशेषत: अशा ठिकाणी जेथे लसीची कमतरता आहे. हे आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यात मदत करेल.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी नेत्यांना सांगितले. प्रत्येकजण “आझादी का अमृत महोत्सवात’ सहभागी होईल याची काळजी घेण्यात आली आहे. या निमित्ताने आपण “भारत जोडो आंदोलन’ च्या माध्यमातून देशाला एकत्रित करण्याच्या दिशेने कार्य केले पाहिजे आणि “एक भारत श्रेष्ठ भारत’ ही खरी भावना दर्शविली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.