नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्याच्या पहिल्या दिवसापासून पेगॅसस फोन टॅपिंग प्रकरणावरुन विरोधकांकडून संसदेत एकच गोंधळ घातला आहे. विरोधकांच्या या गोंधळामुळे संसदेचे कामकाज देखील होत नाही. अनेकदा कामकाजही स्थगित करावे लागत आहे. दरम्यान, आज भाजपा खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
पेगॅसस, करोना स्थिती, शेतकरी आंदोलन तसेच अन्य मुद्द्यांवरुन विरोधकांकडून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला जात असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर आज विरोधक संसदेचे कामकाज सुरळीत चालू देत नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. तसेच, विरोधकांकडून वारंवार संसेदचे कामकाज बंद पाडणे हा संसदेचा, घटनेचा, लोकशाहाची आणि लोकांचा अपमान आहे, असे म्हटले.
संसदेच्या कामकाजावरुन विरोधकांवर टीका करण्याची ही मोदींची एका आठवड्यातील दुसरी वेळ आहे. यापूर्वी, 27 जुलै रोजी बोलावलेल्या भाजपा खासदारांच्या बैठकीतही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. देशातील कोरोना परिस्थितीवर बोलावलेल्या बैठकीचा काँग्रेसने बहिष्कार केला आणि इतर पक्षांनाही येऊ दिले नाही, असा आरोप मोदींनी केला. तसेच, त्या बैठकीत मोदींनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या कामांना जनता आणि मीडियासमोर एक्सपोज करण्याच्या सूचना आपल्या खासादारांना दिल्या होत्या.