मुंबई – खेळाडूंच्या दृष्टीने ऑलिम्पिक स्पर्धा होणे अत्यंत अत्यावश्यक आहे. पण त्याचबरोबर खेळाडूंचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. संयोजकांनी पदकांपेक्षा दुखापती किंवा अन्य गोष्टींचा विचार करू नये. त्यांनी फक्त करोनाविषयक नियमांचे चोख पालन केले जात आहे की नाही याकडे लक्ष द्यावे, असे मत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने व्यक्त करतानाच स्पर्धेच्या आयोजनाला पाठिंबा दिला आहे.
यंदा टोकियोत होत असलेल्या स्पर्धेत भारताला ऑलिम्पिकमध्ये पदकांची जास्त संधी आहे. नेमबाज आणि कुस्तीपटू सध्या भरात असल्यामुळे भारताचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये नक्कीच पदकांची लयलूट करतील, असेही संघटनेने म्हटले आहे.