Gadchiroli Chimur Lok Sabha । गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ. इथून भाजपनं विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान यांचं आव्हान आहे. या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होणार हे स्पष्ट झालंय. मात्र याठिकाणी कितीही निवडणुका झाल्या तरी याठिकाणचे काही प्रश्न हे कायम तसेच राहताना दिसून येतात.
प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देणार का ? Gadchiroli Chimur Lok Sabha ।
यंदाच्या निवडणुकीत २ वेळा खासदार राहिलेले अशोक नेते आणि २ वेळा पक्षाने उमेदवारीसाठी हुलकावणी दिलेले डॉ. नामदेव किरसान थेट लढणार आहेत. पण या दोन्ही उमेदवारांकडून वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या समस्या सोडवणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
गडचिरोलीत कोणते मुद्दे महत्वाचे? Gadchiroli Chimur Lok Sabha ।
* गडचिरोली म्हणजे विकासापासून कोसो दूर हे नेहमीचं आहे. 2009 पासून गडचिरोलीला स्वतंत्र खासदार मिळत असला तरी विकास झपाट्यानं झाला असं चित्र नाही.
* गडचिरोलीत नद्या भरपूर आहेत. इथं पाणीही मुबलक आहे. पण, हेच पाणी नद्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिंचनाची सोय नाही. चिचडोह बॅरेज झाला. पण, अजूनही शेतापर्यंत पाणी येईल याची सोय झाली नाही.
* दुसरीकडे तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर मेड्डीगट्ट्टा उपसासिंचन प्रकल्प बांधला. पण, त्याचा उलटा परिणाम हा गडचिरोलीवर होतो. त्यामुळे सिरोंचा तालुक्यात पूर येऊन गावं पाण्याखाली जातात. एकूणच विकासासोबत सिंचनाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे.
* नद्यांची पात्र मोठी आहेत. पण, त्यावर पूल बांधले गेले नाहीत. अनेक गावांत जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे आदिवासी पाड्यांवरील महिलांना घरीच बांळतपण करावी लागतात.
* शिवाय, आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. रस्त्याअभावी रुग्णवाहिका पोहोचत नाही. त्यामुळे उपचाराअभावी मृत्यू ओढवतो.
हेही वाचा
गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये होणार थेट लढत ; काय आहेत इथली राजकीय समीकरणं?