रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. दहा ते बारा दिवसांपूर्वी अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या शून्य असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५० च्या पुढे गेला आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 52 झाला आहे. कारण मागच्या 10 दिवसांमध्ये तब्बल 45 कोरोनाचे रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने आढळून आले आहेत.
मुंबई आणि पुणे या ठिकाणांहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा देखील वाढता आहे. मागील 10 ते 12 दिवसांमध्ये तब्बल 46 कोरोनाचे रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. यातील जवळपास 42 रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. तर, 2 नर्सिंगच्या विद्यार्थिनींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात यापूर्वीच 5 रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा प्रवास आता कोरोनामुक्त जिल्ह्याकडून कोरोनायुक्त जिल्ह्याकडे सुरु झाल्याचे चित्र आता दिसत आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडू लागली आहे. मागच्या दहा दिवसामध्ये तब्बल 45 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 43 जण हे मुंबई रिटर्न आहेत. तर, रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील दोन नर्सना देखील कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, मुंबई, पुणे तसेच जिल्हाबाहेरून येणाऱ्या गाड्यांची संख्या देखील आता लक्षणीय असल्यानं त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.