मुंबई :- राज्यात काल (दि.४ आॅक्टोबर,रविवार) कोरोनाचे १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६४ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५५ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत (दि.४ आॅक्टोबर,रविवार) पाठविण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमुन्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.२९ टक्के) आले आहेत. राज्यात २२ लाख ०९ हजार ६९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २७ हजार ९३९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात काल(दि.४ आॅक्टोबर,रविवार) ३२६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील –
एकूण: बाधित रुग्ण-(१४,४३,४०९) बरे झालेले रुग्ण-(११,४९,६०३),मृत्यू- (३८,०८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४४१),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,५५,२८१)