नेहरुनगर, (वार्ताहर) – खराळवाडी ते साई चौक भुयारी मार्ग परिसरात मागील काही दिवसांपूर्वी चेंबर तुटल्याने वाहनचालक व नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने येथील चेंबरची दुरुस्ती करण्यात आली.
खराळवाडी ते साई चौक हा रहदारीचा मार्ग आहे. येथून नागरिकांसह वाहनचालकांचा मोठी वर्दळ असते. परंतु चेंबर तुटल्याने वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. परंतु महापालिका प्रशासनाने या मार्गावरील चेंबर दुरुस्त केल्याने नागरिकांसह व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.