पुणे – रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही देत असतो, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते, त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन दैनिक ‘प्रभात’ने दि.६ एप्रिलला रक्तदान शिबिराचा संकल्प केला आहे. हे शिबिर दैनिक “प्रभात’च्या नारायण पेठ, येथील कार्यालयात होणार आहे, यामध्ये जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दै. ‘प्रभात’तर्फे करण्यात आले आहे.
शहरात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा भासतो. तो भरून काढणे अत्यंतिक आवश्यक असते, अन्यथा शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागतात्. एखादी तातडीची शस्त्रक्रिया असेल, तर त्यात रक्ताच्या तुटवड्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळेच आता उन्हाळ्यात रक्ताची गरज लक्षात घेऊन दैनिक “प्रभात’ने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
आपल्या शरीरात असलेल्या साडेचार ते पाच लिटर रक्तापैकी केवळ ३५० ते ४५० एम.एल. रक्तच काढून घेतले जाते. रक्तदान केल्यानंतर लिक्विड घेताच रक्तवाढीची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे वय वर्षे १८ ते ६५ यातील कोणताही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो. १८ ते २५ वयोगटातील जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान केले पाहिजे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन ते चार व्यक्तींना जीवनदान मिळते. त्यामुळेच दैनिक “प्रभात’ने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
अधिक माहिती
रक्तदान शिबिराचा दिवस : दि. ६ एप्रिल २०२४
स्थळ : दैनिक प्रभात, ३०३, नारायण पेठ, लक्ष्मी रस्त्याजवळ, पुणे-३०
वेळ : सकाळी ९.०० ते ५.००
संपर्क क्र. ९९२२-४०-४९०८