Nuh Violence : हरियाणातील नूह येथे सोमवारी जलाभिषेक यात्रेदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात एका महिला न्यायाधीशाने कसे बसे आपले प्राण वाचवले. पोलिसांनी महिला न्यायाधीशासह प्रोसेसर सर्व्हरच्या तक्रारीवरून नूह पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त न्यायदंडाधिकारी अंजली जैन या त्यांच्या बंदूकधारी सियाराम, प्रोसेसर सर्व्हर टेकचंद यांच्यासह त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला नल्हार येथील वैद्यकीय महाविद्यालयातून औषधे घेण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्या परत येतांना नुह जुन्या बसस्थानकाजवळ सुमारे 100 ते 150 अज्ञातांनी अंजली जैन यांच्य गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे त्या घाबरल्या आणि सियाराम आणि टेकचंद या बंदुकधारींच्या मदतीने त्यांनी कसा तरी जीव वाचवून वर्कशॉप गाठले.
याबाबत त्यांनी काही वकिलांना माहिती दिल्यावर वकिलांनी घटनास्थळ गाठून त्यांना तेथून बाहेर काढले. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. न्यायाधीशांनी वाहनाची चौकशी करून कर्मचाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले, मात्र तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते.
या घटनेबाबत टेक चंद यांनी सांगितले की, हे पाहताच न्यायाधीशांच्या गाडीच्या काचेवर दगड पडला आणि गोळ्या झाडू लागल्या. आम्ही आपला जीव वाचवण्यासाठी जुन्या बसस्थानकाच्या वर्कशॉपमध्ये लपून बसलो, असे तक्रारीत म्हटले आहे. नंतर न्यायालयातील वकिलांच्या मदतीने आम्ही तेथून बाहेर आलो. 1 ऑगस्ट रोजी आम्ही कार पाहण्यासाठी गेलो असता न्यायाधीशांची कार पूर्णपणे जळाली होती. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एका निवेदनात सांगितले की, हिंसाचारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर नूहमधील नल्हार आणि गुरुग्राममधील मेदांतासह विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पोलिसांनी हिंसाचाराच्या आरोपाखाली 116 लोकांना अटक केली आहे, त्यांची चौकशी केली जात आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या केंद्र आणि राज्याच्या 50 कंपन्या सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आल्या आहेत.