नवी दिल्ली – देशात आता कोणताही विखारी प्रचार चालणार नाही असाच संदेश दिल्लीतील जनतेने आजच्या निवडणूक निकालातून दिला आहे अशी प्रतिक्रीया राष्ट्रीय जनता दलाच्यावतीने त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार मनोज झा यांनी दिली आहे. बिहार विधानभेची आता लवकरच निवडणूक होत आहे तेथूनही हाच संदेश भारतीय जनता पक्षाला दिला जाईल असा विश्वासहीं त्यांनी व्यक्त केला आहे.
दिल्लीत राष्ट्रीय जनता दलाने कॉंग्रेस समवेत आघाडी केली होती. व त्यांचे चार उमेदवार दिल्लीत उभे होते. या चारही उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे.
या संबंधात दिलेल्या प्रतिक्रीयेत त्यांनी पुढे म्हटले आहे की दिल्लीच्या निकालापासून बोध घेऊन भारतीय जनता पक्षाने आता आपल्या निती मध्ये बदल केला पाहिजे, समाजविघातक राजकारण त्यांनी सोडले पाहिजे.