नाशिक – भोंग्याचे राजकारण कुणाचे आहे आणि त्यामागे कोण आहे हे जनतेने दाखवून दिले आहे. शिवसेनेने हिंदुत्वाची निवडणूक काही आताच लढविली नाही. विलेपार्ले येथे शिवसेनेने जिकलेली पहिली निवडणूक तेव्हापासून हिंदुत्वाचा मुद्दा आमचा आहे.
काल कुणी तरी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचू असा इशारा दिला. पण, ज्यांनी ही धमकी दिलीय त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आज हनुमान जयंती आणि सगळीकडे हनुमान चालीसा, भोंगे वाजताहेत. पण, ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले त्याने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.
आज हजारो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले. तिकडे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल लागला. निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला. याच काळात काही लोकांनी भोंगे, हनुमान चालीसा यावरून घाणेरडे राजकारण सुरु केले.
आज पोथ्या वाचताना काही जणांचे फोटो समोर आले. हनुमानाचे हे इतके मोठे भक्त आहेत तर हनुमान चालीसा यांना पाठ असायला हवी होती. आज हे हे काही चालू आहे. त्यातील अनेकांना राष्ट्रगीत, वंदे मातरंमही म्हणता येत नाही. मी अक्खी हनुमान चाळीसा वाचून दाखवतो. भीमरूपी हनुमान आमच्या मागे आहे हे कोल्हापूर जनतेने दहवून दिले आहे असेही ते म्हणाले.
पण, या निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव करून त्यांचे भोंगे खाली उतरविले. तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण, त्याचा फायदा झाला नाही. भाजपने नवं हिंदुत्ववादी एमआयएमचे ओवेसी यांच्याकडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना प्रमुख यांची कॉपी करण्याचा प्रयत्न काहींनी केला.