Mallikarjun Kharge on PM Modi| काँग्रेस पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी मध्य प्रदेशातील धार येथील जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ‘ज्या घरात मोदींचा फोटो असेल, ते घर गरीब झाले असे समजा,’ असे खर्गे यांनी म्हंटले.
मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले ? Mallikarjun Kharge on PM Modi|
”तुम्ही टीव्ही चालू करताच तुम्हाला त्यावर मोदींचा फोटो दिसतो. ज्या घरात मोदींचा फोटो टीव्हीवर दिसतो ते घर गरिबीत जाते. पंतप्रधान मोदींना विकास, गरिबांचे कल्याण नको आहे. त्यांना आमच्या मुलांचे शिक्षण नको आहे. कारण गरीब मुले शिक्षण घेऊन पुढे आली तर अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे मोदी गरिबांच्या विरोधात काठी उगारतात. काँग्रेस पक्ष पुढे सरकला की ते चिरडण्याचे काम करतात,” असे खर्गे म्हणाले.
#WATCH | During Bharat Jodo Nyay Yatra in Madhya Pradesh’s Dhar, Congress President Mallikarjun Kharge says, “The moment you switch on the TV, you see Modi on it. The household where Modi’s photo comes on TV goes into poverty….” pic.twitter.com/3xHTadWx35
— ANI (@ANI) March 6, 2024
पुढे ते म्हणाले, ”आज देशात ४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी आहे. देशात दररोज महागाई वाढली आहे. हे सर्व मोदींच्या काळात घडले आहे. देशातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी संपू नये, असे पंतप्रधान मोदींना वाटत आहे. श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावे आणि गरीबांनी अधिक गरीब व्हावे, अशी मोदींची इच्छा आहे. मोदी म्हणाले होते, मी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देईन, मी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकीन. मी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करीन, शेतकऱ्यांना एमएसपी देणार पण काहीही केले नाही.”
मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर शिवराज सिंह चौहान यांना बाजूला सारल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “भाजप नेते काँग्रेसबद्दल चुकीचे बोलतात. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह चौहान खर्गे आणि राहुल गांधी काँग्रेसला नष्ट करण्यासाठी एकत्र काम करत असल्याचे म्हणाले होते. मग आता भाजपने शिवराज सिंह चौहान यांना सत्तेवरून का हटवले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.”
राहुल गांधी काय म्हणाले ? Mallikarjun Kharge on PM Modi|
तर राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की,” काही वेळापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये पाहिले होते की भाजप नेता एका आदिवासी तरुणावर लघवी करत होता. हा कसला विचार आहे? ही भाजपची विचारधारा आहे. हे फक्त आदिवासींसोबतच घडत नाही. दलित, आदिवासी आणि गरिबांच्या बाबतीत होत आहे. मध्य प्रदेशात आदिवासींची लोकसंख्या २४ टक्के आहे आणि संपूर्ण देशात ८ टक्के आहे, पण देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाची यादी पाहिल्यावर आदिवासी समाजातील एकही मालक सापडणार नाही.”
हेही वाचा:
महिलांसाठी उपयुक्त ठरणार ‘मेरी सहेली योजना’; ‘या’ पद्धतीने पुरवली जाते सुरक्षा
‘भाजपाने केसाने गळा कापू नये, अन्यथा माझं नाव..’ शिंदे गटाचा नेता भडकला