Meri Saheli Yojana| अनेकदा महिला सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता महिलांसाठी सुरक्षित आणि प्रगतीशील वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार प्रत्येक क्षेत्रात अनेक प्रयत्न करत आहे. देशभरात महिलांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारकडून एक योजना राबविली जात आहे. त्या योजनेचे नाव ‘मेरी सहेली योजना’ असे असून त्याबाबतची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
‘मेरी सहेली योजना’ काय आहे? Meri Saheli Yojana|
‘मेरी सहेली योजना’ ही ट्रेनमध्ये प्रवास करताना महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास ‘मेरी सहेली योजना’ या योजनेअंतर्गत महिला तक्रार करू शकतात. विशेषत: ट्रेनमध्ये एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना ही योजना फायद्याची ठरणार आहे.
कोणत्या महिलांना मिळणार योजनेचा लाभ?
मेरी सहेली योजनेच्या टीममध्ये फक्त महिलांचा समावेश असेल. ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला विशेष सुरक्षा मिळेल. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची काळजी फक्त महिलाच घेतील. ही टीम एकटीने प्रवास करणाऱ्या महिलेला ती कुठे जात आहे? कोणी तिचा छळ करत आहे का? ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत आहे का? याबाबतची माहिती विचारु शकते.
त्यामुळे आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांना काळजी करण्याची गरज नाही. मेरी सहेली योजना ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची ओळख करून देईल आणि त्यांना विशेष संरक्षण देईल. याशिवाय त्या महिलांवरही नजर ठेवण्यात येणार आहे. महिला प्रवाशांना प्रत्येक स्थानकावर वेगवेगळी टीम मिळेल. या योजनेनुसार, कोणत्याही कारवाईसाठी रेल्वे स्थानकांवर आरपीएसएफ एस्कॉर्ट कर्मचारी आणि आरपीएफ उपस्थित राहतील.
टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता Meri Saheli Yojana|
महिला प्रवाशांना ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्या टोल फ्री क्रमांक 182 वर तक्रार करू शकतात. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण किंवा गैरसोय झाल्यास या क्रमांकावर संपर्क करता येऊ शकतो. सप्टेंबर 2020 मध्ये हा उपक्रम दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये सुरू करण्यात आला. ज्यामध्ये महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली होती. सध्या ही योजना महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.
महिलांसाठी इतर सुविधा
यासोबतच महिलांना ट्रेनमध्ये विविध सोई देखील पुराव्याला जातात. देशातील एक्सप्रेस रेल्वेमध्ये अनारक्षित क्षेणीतील महिलांसाठी स्वतंत्र डबा राखीव असतो. या व्यतिरिक्त 150 किमी पर्यंतचे कमी अंतर पार करणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये महिलांसाठी वेगळे डबे किंवा कोच हे राखीव असतात.
तसेच भारतीय रेल्वेकडून महिलांसाठी खास विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जातात. जर तुम्ही गरोदर असाल आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला मधला किंवा वरचा बर्थ देण्यात आला असेल तर, तुम्ही बर्थ एक्सचेंज करू शकता. रेल्वेतील बर्थ एक्ससचेंज करण्याचा महिलांना अधिकार आहे.
हेही वाचा:
अनुपम खेर यांचे चाहत्यांना सरप्राइज; ‘या’ चित्रपटातून पुन्हा दिग्दर्शनात करणार कमबॅक